प्रगती
चौथरे राऊळांचे जिंकून काय होते
भक्तीची तहान आटून गेल्यावर ।
पाण्यावर महाचर्चा घडवून काय होते
तोंडचेच पाणी पळून गेल्यावर ।
विकासाचे झेंडे फडकावून काय होते
आरक्षणात सगळे करपून गेल्यावर ।
आठवीपर्यंत सर्वा ढकलून काय होते
शिक्षणातील ओढ हरवून गेल्यावर ।
गल्लोगल्ली पुतळे उभारून काय होते
त्यांच्याच स्वप्नांना विसरून गेल्यावर ।
अनुदानाची भीक वाटून काय होते
झाडास बळीराजा लटकून गेल्यावर ।
- विशाल आपटे १६ जून २०१६
No comments:
Post a Comment